Socio-Architectural Blog

Tuesday, March 03, 2009

सरणार कधी रण

सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शीरी

सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर साहू घाव शीरी
सरणार कधी रण ॥धृ॥

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतरज्योती -- २
कसा सावरू देह परी ॥१॥

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले आधीर लोचन
खड्ग गळाले भूमीवरी ॥२॥

पावन खिंडीत पऊल रोवून
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण -- २
बोलवशीलका आता घरी ॥३॥

-कुसुमाग्रज

-शिवकल्याण राजा-

Saturday, March 01, 2008

माझे जीवन गाणे

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे ॥धृ॥

व्यथा असो आनंद असू दे,
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे ॥१॥

कधी ऐकतो गीत झऱयातुन,
वंशवनाच्या कधी मनातुन
कधी वाऱ्यातुन कधी ताऱ्यातुन, झुळ्झुळतात तराणे ॥२॥

तो लीलाघन स्तय चिरंतन,
फुलापरी उमले गीतांतुन
स्वरास्वरांतुन आनंदाचे, नित्य नवे नजराणे ॥३॥

या विहगांनो माझ्या संगे,
स्वरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन, उसळे प्रेम दिवाणे ॥४॥

-मंगेश पाडगांवकर

Monday, January 21, 2008

Capturing Time 18X


I v got a time machine.
As usual my initial Pix were of Macro mode like insects, Flowers etc,
Then i tried to capture sunsets with little manual mode than Auto.
Every Novice photographer's basic dream of capturing trail of car lights on a busy road were also fulfilled easily.. But it was all thanks to my camera which had all those ready made modes. All i had to do to click these pics were to just turn on the respective dial and camera did the rest..
then i tried my hand on the brightest object in the night sky.. The MOON.
I am very much fascinated with the heavenly object.. I always wanted to see craters, I always tried to have a look through my binoculars, but the magnification was not satisfactory.
first few pix were not satisfactory and very blurry, then i shifted to Manual mode and adjusted aperture size and Shutter speed and i clicked.. I was mesmerized with the result.. here is my first clear image of the moon..

Friday, September 22, 2006

सामाजिक क्रांतिकारक

स्वातंत्र्य मिळून तब्बल ५९ वर्ष उलटली. पण आपल्यात काहिच बदल नाही झाला. अजूनही मानसिकता विज्ञाननिष्ठ नसून कुठल्या तरी धर्म, शास्त्र, श्रद्धा अणि पर्यायाने कर्म करण्याची भिती यातच अडकली आहे. सतत कुठल्या न कुठल्या रीती चालिंची ग्वाही देत पळवाट शोधत असते. समाज हा नेहमीच सुधारणेच्या बाबतीत तठस्थ राहत आला आहे. पुरुष-प्रधान विचारसरणी नेहमी त्याचा दृष्टिकोन ठरवत गेली. खूप कमी लोक अशी होऊन गेली की ज्यांनी हा सामाजाचा ताठरपणा मोडून त्याला या सर्व जाणीवपूर्वक दुर्लक्षिलेल्या प्रश्णांकडे गांभीर्याने बघायला लावले. कहींना समाजास झुकवणे जमले, पण बरेचसे स्वत: मोडून गेले पण तरिही त्यांनी कार्य कधी सोडले नाही.
गेल्या आठवड्यात अश्याच विषयांवर कही चित्रपट "सलग" बघायला मिळाले हा एक योगायोगच म्हणावा, त्यात हातभार घालायला सोबत काही पुस्तके पण होतीच.
प्रथम "रामशास्त्री", प्रभात फिल्म कं. ने सन १९४४ साली हा चित्रपट बनवला. प्रमुख भूमिका ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक- श्री. गजानन जहागीरदार ह्यांनी जीवंत केली होती. हा चित्रपट मी खरतर आधी अनेक वेळेला बघितला होता, पण कधी रामशास्त्र्यांची निस्पृह न्यायशीलता, कधी जहागिरदारांचा, ललिता पवारांचा अभिनय तर कधी प्रभातचे चित्रपट बनवण्याचे कसब, हेच लक्षात रहायचे. परवा बघताना एक खूपच वेगळा विचार समोर आला.
रामशास्त्री ह्यांची समाजा विषयची दृष्टी खूपच मानवतावादी होती. त्यांना हे कळत होते की समाज सुधारल्याशिवाय सुराज्य संभव नाही. एका प्रसंगात, एका दासीच्या लग्नाची फ़िर्याद माधवराव पेशव्यांसमोर येते तेव्हा कुठल्या तरी शास्त्राचा(?) आधार घेऊन फ़िर्यादी दासीचे लग्न अवैध ठरवतो तेव्हा रामशास्त्री पेशव्यांना ठणकवून सांगतात की माणसाची विक्री योग्य ठरवणारे ते शास्त्रच चूक आहे. त्यामुळे जरका दासीची विक्रीच मानवतेच्या विरोधात तर तिचे लग्न चूक ठरवणारे शास्त्र बदलणे भाग आहे. हा कालखंड १७५०-६० च्या सुमारचा आहे. त्यावेळेस राज्यपदी माधवरावांसारखा द्रष्टा माणुस बसला होता म्हणून त्यांनी योग्य त्या सुधारणा केल्या. रामशास्त्र्यांना खंबीर राजाची साथ मिळाली म्हणून अशा प्रथा बंद पडल्या. बाकिचे तर आपल्याला महीतच आहे. काही बाबतीत इंग्रजांना मानायला पहिजे. राजा राममोहन रॉय ह्यांच्या प्रयत्नांना फळ त्यांनीच मिळवून दिले, सती प्रथा ही आपल्या समाजाची एका स्त्री कडे बघण्याची दृष्टी दाखवते, ती त्यांनी कायद्याने बंद पाडली. पुढिल चित्रपट असाच माझ्या मनामध्ये उलट-सुलट विचारांचे जाळे विणत गेला. त्यामध्ये असणारे शास्त्राचे(?) प्रयोजन मलातरी विचलित करून गेले. इतके की माझ्यासाठी बाकीचा चित्रपट निरर्थक राहिला. "२२ जून १८९७" हे त्या चित्रपटाचे नाव. नचिकेत व जयू पटवर्धन ह्यांनी हा चित्रपट बनविला आहे. त्यामध्ये प्रभाकर पाटणकर, रवींद्र मंकणी, सदाशिव आमरापूरकर ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. मला दिग्दर्शकाचा दृष्टीकोन नक्की काय आहे हेच नाही कळत, मलातरी तो थोडासा गोंधळलेला वाटतो.
ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीची आहे. तेव्हा झालेल्या कथित अत्त्याचारांचा बदला म्हणून चापेकर बंधू हे रॅंड नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध करतात. चित्रपटामध्ये दाखवलेले अत्याचार मला तरी इतके भीषण नाही वाटले. मला खरे काय झाले माहीत नाही पण चित्रपटाने माझ्यासमोर पुरेसे चित्रच उभे नाही केले. वारंवार एकाच गोष्टी वर राग व्यक्त केला गेला, की रॅंड च्या आदेशावरून प्रत्येकाचे घर मग तो भलेही ब्राह्मण असो वा क्षूद्र(?) सैनिकांकरवी पूर्णपणे निर्जंतुक करून घेतले. चापेकरांचे घर सुद्धा अशाच प्रकारे साफ करून घेतले गेले. त्यांना मुख्य राग हा, की खालच्या(?) जातीच्या माणसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढलं आणी ज्यांनी विरोध केला त्यांना बळ वापरून बाहेर काढले, विटाळ केला, त्यांचे देव देखील "निर्जंतुक" केले. माझ्या मते हा काही असा गुन्हा नाही की त्याबद्दल कोणाचा वध करावा. खरतर मला तरी अस वाटल की चित्रपट इथे बराच कमी पडला. चित्रपटात एक दृष्य आहे, त्यामध्ये हे चापेकर बंधू एका लग्नाला उपस्थित न रहाण्याचे कारण हे त्या वधुचे वय "शास्त्रा" बाहेर असल्याचे कारण देतात. ते म्हणतात की ती मुलगी ही १३ वर्षांपेक्षा मोठी असल्यामुळे तिचे लग्न हे अ-शास्त्रीय होते. मुख्य म्हणजे मला त्यांचा दृष्टिकोन बराच चुकीचा व बुरसटलेला वाटला, सुधारणेच्या विरुद्ध वाटला. खरतर रॅंड साहेबाने अशा कडक उपायांमुळेच प्लेग सारख्या महामारीवर नियंत्रण मिळवलेले होते. त्यातून शिकायचे सोडून हे काय भलतेच डोक्यात भरले!! त्यावेळेपर्यंत खरतर सामाजिक सुधारणेचे उपाय सुरू झले होते. बरेच जण प्रयत्न करत होते, जसे महात्मा फुले, आगरकर, वगैरे वगैरे... त्या लोकांमध्ये एक वेगळीच धडाडी होती. विचित्र, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आणि मुख्यम्हणजे मानापमानाच्या, आत्मस्तुतीच्या व स्वताःच्या अहंकारासाठी स्त्रीचे अस्तित्व नाकारणारया समाजापुढे खंबीरपणे उभे राहून त्याला त्याची चूक दाखवून द्यायची छाती त्यांच्यापाशी होती. समाजाकडून असह्य त्रास झाला, पण ही माणसं आपापलं हाती घेतलेले काम करीत राहिली.
त्याच काळात अजून एक महात्मा (खरतरं महर्षी) असाच समाजानी उपेक्षिलेल्या प्रश्णावर कार्य करत होता, नव्हे स्वतःहून त्यावरती आचरण देखील करत होता. तो प्रश्न होता विधवांच्या भविष्याचा. आणि तो महामानव म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. "शास्त्राने" केवळ अशक्य असणारया विधवेच्या पुनर्विवाहासाठी बळ म्हणून स्वतःहून प्रथम एका विधवेशी विवाह केला. हा काळ देखील चापेकर बंधूंचाच आहे, पण विरोधाभास बघा. कर्व्यांचे विचार हे खरे क्रांतिकारी होते. त्यांनी एका स्त्रीचे समाजातील स्थान हे पुरुषाच्या बरोबरीचे आहे हे जाणले होते.. जरका एका विधुराला परत लग्न करता येते तर एका विधवेला तो हक्क का नसावा?? तिला देखील काही शारिरीक सुखाच्या भवना असतात हे त्यानी जाणले होते. त्यांनी अशा शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांसाठी एक शिक्षणसंस्था व रहाण्यासाठी एक आश्रम हिंगणे येथे काढला.
बरेच वेळेला असे होते की एखाद्या महात्मा माणसाचे कार्य इहलोकातून त्याच्या बरोबरच जाते, पण अशी काही उदाहरणे आहेत की जेथे एका माणसचे महान कार्य त्याच्या पुढील पिढ्या तेवढ्याच सक्षम पणे पुढे वाढवतत. नावच घ्यायचे तर बाबा आमट्यांपेक्षा अजून चपखल उदाहरण नाही सापडत.(सध्या त्यांची तिसरी पिढी त्याच कामात झटून काम करत आहे)
अशाच एका थोर व स्वाभाविकपणे उपेक्षिलेल्या एका "सामाजिक क्रांतिकारकावर" अमोल पालेकरांनी एक अत्युत्तम चित्रपट बनवला आहे- ध्यासपर्व. रघुनाथ धोंडो कर्वे, हे त्यांचे नाव. ह्यामध्ये त्यांची मध्यवर्ती भुमिका किशोर कदम ( कवी सौमित्र) ह्यांनी अत्यंत जीव ओतून केली आहे. त्यांच्या पत्नीच्या (मालतीबाई कर्वे)भूमिकेत सीमा बिस्वास ह्या अक्षरशः जगल्या आहेत. बाकीची पात्र ही जाणीवपूर्वक सहायक व छोटी ठेवली आहेत. कुठेही मुख्य विषयापासून चित्रपट भरकटलेला नाही. अशा विषयावर ह्या आधुनिक युगात साधा चित्रपट काढताना/बघताना इतका त्रास/संकोचल्यासारखे होते तर त्या काळात तसे काम करताना काय काय सहन करावे लागले असेल हे जाणवते. हा समाज, एका स्त्रीने साधे शिक्षण घेण्या-देण्या वरून महात्मा फुले व सावित्रीबाईंना इतका त्रास देऊ शकतो तर ह्यांचा विषय त्यांना पचणे शक्यच नव्हते.
लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादना साठी नसून सुखासाठी देखील असतो. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरं व्हायची, त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती देखील खालावयाची. खूप मुले झाल्यामुळे शारिरीक सुखाची भिती वाटायला लागायची, अशा भितीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अश्या गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बरेच रोग व्याधी निरोगी घरामध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्येमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला. एक सोप्पा उपाय त्यांना सापडला- संततीनियमन. फ्रांस येथील वास्तव्यामध्ये त्यांनी त्यासंदर्भात बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून नियमनाची साधनं व पुस्तकं घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संतती नियमन् केंद्र चलू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. समाजस्वास्थ्य नावाचे मासिक चालू केले. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रीयांना देखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना नाही पचले, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. भारतच्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी सध्या संतती नियमन करीत असावीत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरी देखील ते केवळ स्वताःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्नीने, व आई-वडिलांनी(धोंडो केशव कर्वे) पूर्ण खंबीरपणे मागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रॅंगलर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला तेव्हा त्यांची केस बाबासाहेब अंबेडकरांनी लढवली होती. त्यामुळे जरी ते केस हरले असले तरी त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.
अशी ही तीन माणसे अणि त्यांच्या वर बनलेले हे तीन चित्रपट, एक वेगळाच विचार करायला लावतात. नेहमीच्या साचेबंद आयुष्यात/समाजात आपली भुमिका नक्की काय आहे असा प्रश्ण उपस्थित करतात. असे काही चित्रपट सर्वांनी बघावे असे वाटते.
-- शिरीष माधव गानू
२२/०९/०६ ते १२/१०/०६

Saturday, August 26, 2006

सुरेख सकाळ

्माफ करा पण याचा "सकाळ" पेपर वाल्यांशी काहिही संबंध नाही.
खरच, आज फारच सुरेख सकाळ पडली आहे. बर‍याच दिवसांनी कोवळे ऊन पडले आहे. खूप दिवसांचा पाऊस मरगळ देऊन गेला होता, ती झटकून टाकावीशी वाटली. कधी नव्हे तो माझ्या सारख्या पक्क्या नास्तिकाला देखिल देवाला फुलं वहाविशी वाटली. तुपाचा दिवा लावून उदबत्ती ने घर सुगन्धी दरवळून टकावेसे वाटले. वाहिलेली फुले तरी कसली तर- प्राजक्ताची. काय सुंदर असते ते फूल! पहाटे पहाटे झाडावरून अलगद तरंगत ते खालती पसरलेल्या दुर्वांच्या गर्दीवर पडते. हिरव्या गवतावर पांढरे शुभ्र फूल काय छान दिसते! त्याचे ते केशरी देठ, तो सुन्दर आकार आणि मंद पण प्रसंन्न करणारा गंध. आजची सकाळ सार्थकी लाऊन गेला. आजच्या सकाळला अगदी "सणाचा" वास येतोय. उद्या पसून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाची आगामी चाहूल ती देते आहे. फुललेले प्रत्येक फूल हे पुढील आनंदाच्या खुणा दाखवत आहे. जोमाने उठून कामाला लागावेसे वटते आहे त्यामुळे मी आपली रजा मागतो...
" गणपती बाप्पा- मोरया! "

Friday, August 25, 2006

Crying out loud.....

Yesterday I saw one of the most controversial film ever made here in India. The co-incidence was a gentleman filed a petition against the currently running film “Omkara”,stating that it is very very harmful and disturbing to our “great Indian culture”. It contains matter, which is very vulgar and the language is too abusive. Incidentally a journalist asked the gentleman about his whereabouts at the time of the film I am going to talk about now. The Bandit Queen.
It was in my mind to see this film for a long time but it happened to be yesterday when I got the opportunity. The film is directed by the very sensitive and talented Shekhar Kapoor. And is brought to the reality by great performances by Seema Biswaas, Nirmal Pandey, Manoj Bajpai, Govind Namdev, Saurabh Shukla, Aditya Srivastava. The film is made very effective with its script and dialogues written by Ranjit Kapoor. The Score is very essential in this film to convey the right emotion of the situation. This task is performed to perfection by the great man himself- Nusrat Fateh Ali Khan.
The film is so intense that it leaves a big and deep impression on your mind that it bleeds. At least I had a sleepless night. You read about such things happening in our country as gang rape and the intense fight of casts, even on roads near slums one sees man beating his wife brutally, but one never feels the intensity of the situation. But the film really digs deep in you and wakes you up with an ice running down your spine. It hits you most where it hurts- your Ego and false concepts of self-pride. Out of this ego only such talks of “damaging Great Indian Culture” arises. This film really opens your eyes to the reality which we are hiding for centuries with an invisible iron curtain of Religion and culture.
The film is extremely realistic and does not hide any thing. It is very brutal and straightforward and is deliberately devoid of any false impressions created using traditional Symbolism generally used to convey some awkward things. It is made like looking in a clear mirror- showing what is in front of it… there are many rape scenes, constant abusive language, and the unthinkable full nudity. The intensity is such that I really wanted to stop in between, but it really grips your neck and drags you till the end with its speed and everything else.
There is only one shot of some entertainment when Shekhar Kapur himself comes in as a sardar truck driver and looses his teeth by laughing in front of Phoolan Devi. Rest is simply tiring. I felt mentally exhausted after the film was over. I was hoping the film to get over early… I m a great fan of Shekhar kapoor right from Masoom, Mr. India and the Oscar aspirant Elizabeth. He has provided flawless entertainment, but this film was some thing different. The film is set in a very realistic arid, dry chambal river basin. Looking at the landscape one can understand the impossible task of catching these bandits. It must also have been a challenge to shoot a film in such conditions. Secondarily the cast and extras are very very real.. Seema Biswas LIVES Phoolan Devi. She has taken very high risk by playing such a character. Nirmal pandey is also the main anchor of the film.
The issue arises, is there a need to make so realistic films? The basic principal is to entertain. Then why take pains to make such film. Cause as I have already expressed in my earlier blogs, the film is one of the most effective medium of expression. If used rightly then it can really make a difference in the mentality of the population.

p.s. Some other realistic films I liked but also Hated- Irreversible( French), Boys don’t cry. Etc.

pls pls Shekhar Kapoor do think of making sequal of this film.. The next half of Phoolan Devi's life is as interesting as the first half. right from her capture, her elections for Lok sabha, life as MP and ultimately her murder..

Wednesday, August 23, 2006

श्रद्धा.....

काल रात्री गंमत झाली, Breaking News परत आली.
तर्काच्या ऐवेजी अंधश्रद्धा नाचली, समुद्रावर ही.. गर्दी लोटली.

चमत्कार चमत्कार, पीर बाबाला नमस्कार,
बाबाची करणी, समुद्रात गोड पाणी.
सब रोगोंका एकही इलाज.....
लोक गाऊ लागली गाणी, पिऊन घाणेरड ते गटाराचे पाणी.
हीच आपली थोर संस्कृती, तरी थांबली आहे विकासाची गती.

आता विकास म्हणतात ते तरी काय?

कशा पाई करतात कष्ट? का बोलू मी स्पष्ट!!
मी स्पष्ट बोलून कुठच जग हलणार आहे,
दीड अब्जांच्या गोंगाटात लगेचच विरून जाणार आहे!
सर्व नाक डोळे मेंदू कान, झुकवितात केवळ अंधश्रद्धे साठी मान.
अशी श्रद्धा काय कामाची, जी घेऊन येई महामारी.
मला सगळे दिसते स्पष्ट, सर्व होणार आहे नक्किच नष्ट.

निसर्ग हा कृती अपेक्षितो, बलवान हा दुर्बलाला भक्षतो.
जगात बलवान किती, दुर्बल किती, मांडता येतील का आकडे?
सगळ्यात सोप्पे, व्हा मोकळे, घालून देवाला साकडे.

मुख्यमंत्री करतात महापूजा. घालून बारा अंगठ्या दहा बोटात.
चिंता नसते जनांची, तर नवीन वर्षात काय भरायला मिळेल पोटात.
या अंधश्रद्धेची वाटते मला लाज, अंगावर नसते चिंधी तरी चढवतात देवीवर साझ.

मुंबई-शांधाई, पुणे- बॉस्टन,
हे बोलणे केवळ मिठाईचे वेष्टण.
बिन्डोक जनतेला दाखवतात आतल्या मिठाईची लाच,
लावून IT Park ला भिंतभर काच.

त्या काचेपलिकडे दडली आहे वैचारिक कमकूवत,
असाध्य-साध्य कसे होईल, पाश्चात्य शैली अनुकरत!!
IT मधून आला पैसा, तळागाळात कसा पोचणार?
नवे मम्मी-डॅडी मुलांसोबत केवळ BIG Mac खाणार.

नव्या गाडीतून घरी जाता जाता, येई दत्त मंदिर आडवे,
गाडीतूनच "ओठ-कपाळ" करून गातात Indian cultural गोडवे.
लायकी तसे मिळते, अजूनही निम्मी जनता दोन घास कमीच गिळते.

उपाय काय?? वैतागून टेबलावर घट्ट मूठ आपटली,
बिचारी मुंगी त्याखाली सापडली.
मेल्या मुंगीने दिली कल्पना, चिरडून टाका त्यांना,
ज्यांना नाही फिकीर कोणाची, ना मनाची ना जनाची.
सुचून असली कल्पना, मी गालातल्या गालात हसलो,
काम सोडून या नव्या कुठल्या फंदात मी फसलो!!!!

समस्येचे कळले बहुतेक मला मूळ,
काळच ठरवेल, हे माझे ध्येय का माझे खूळ.
कामे करून घ्यायला, झिजवीन माझ्या बुटाची टाच,
तरी देणार नाही, एक दमडी देखिल मी कोणाला लाच!!!!!

---------------शिरीष माधव गानू
१८/०८/२००६